हरघर संविधान घरघर संविधान
राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे झासी राणी सांस्कृतीक मंडळाचे निवेदन
रिपोर्ट : रमाकांत यादव जिला प्रतिनिधी • ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
चंद्रपुर/ महाराष्ट्र
दिनांक १०/११/२०२३
सविस्तर बातमी:-भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा मोहीम सुरू केली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महीने 18 दिवस रात्र दिवस मेहनत घेऊन भारतातील सर्व नागरिकांना समान अधिकार मिळावा या करिता तयार केले भारतीय संविधान हे घरोघरी पोहचावे या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा मोहीम सुरू केली. त्याच प्रमाने भारताच्या संविधान दिनाला यंदा ७४ वर्ष पुर्ण होत आहे तर पुढल्या वर्षी २०२४ ला ७५ वर्ष पुर्ण होतील. त्याच अनुशंगाने देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने “हर घर संविधान घर घर संविधान” मोहिम सुरु करावी त्यामुळे देशातील प्रत्येक राज्यातील लोकांना भारतीय संविधान म्हणजे काय आणि संविधानाचे महत्त्व काय आहे याची लोकांना पुर्णपणे माहिती होणार व त्या करीता केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने व राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदना तुन राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे झासी राणी सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी केली आहे.